तांदूळ २ वाट्या, एक खोवलेला नारळ, चिरलेला गूळ २ वाट्या, काजू - बदाम तुकडे, बेदाणे, वेलदोडयाची पूड, तूप, ५ - ६ लवंगा.
कृती :
तांदूळ धुवून निथळून ठेवावेत. अर्ध्या तासानंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. दुसरीकडे कढईत तूप गरम करून त्यात लवंगा घालून तळून तांदूळ घालावेत. तांदूळ मोकळा होईपर्यंत परतावे. मग त्यात नारळाचा चव घालून परत थोडावेळ परतावे. मग गरम पाणी घालावे. भात शिजत आल्यावर, काजू बदाम तुकडे, बेदाणे घालून हलवावे. भात पूर्ण शिजल्यावर त्यात चिरलेला गूळ घालावा. मंद आचेवर शिजवावे. गूळ पातळ होऊन विरघळल्यावर हलवून झाकण ठेवावे. खाली भात करपणार नाही याची काळजी घ्यावी. वेलदोड्याची पूड घालावी. खाताना भातावर थोडे ओले खोबरे पसरावे व तूप घालावे. गूळामुळे या भाताला खमंगपणा येतो.
No comments:
Post a Comment